Paid-By-Marathi Kattaa

संत तुकाराम महाराज यांचा संपूर्ण जीवनप्रवास | Sant Tukaram Maharaj Information in Marathi

 संत तुकारामांबद्दल संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो मराठी कट्टा या मराठी वेबसाईटवर तुमचे स्वागत आहे. तर आज आपण या लेखामध्ये संत तुकाराम महाराज यांचा जीवनप्रवास पाहणार आहोत. आणि हा लेख वाचल्यानंतर कसा वाटला हे खाली कंमेंट करून सांगायला विसरू नका.


तुकारामांचा जीवन परिचय

तुकारामांचा जन्म देहू येथे 1606 साली झाला. त्यांचे वडील वोल्होबा आणि आई कनकाई. त्यांना सावजी नावाचा एक भाऊ पण होता. त्यांचे घर हे वारकऱ्यांचे घर होते. त्यांचे वडील वोल्होबा धार्मिक वृत्तीचे होते. तुकारामांचा वाणसामानाचा व्यवसाय होता आणि त्या व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी ही तुकारामांवर होती. तुकारामांची दोन लग्न झाली. पाहिले लग्न हे तुकारामांच्या तेराव्या वर्षी झाले तर दुसरे लग्न सतराव्या वर्षी झाले. मात्र परपंचाचे सुख तुकारामांना फारसे लाभले नाही. त्याचे वडील मरण पावले. त्यांच्या पाठोपाठच आईचेही निधन झाले. त्यांनतर .. 1629 ते 30 या वर्षात महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ पडला. त्याचा परिणाम हा तुकारामांच्या व्यवसायाला आणि परिणामी प्रपंचलाही बसला. तुकारामांना यात गुरेढोरे विकावी लागली.

भयंकर हलाखीच्या आणि उपासमारीची अवस्थेत तुकारामांना दुःख सहन होईना. त्यांचे मन हळूहळू संसारापासून दूर जाऊ लागले. देहूजवळच्या भांडाऱ्याच्या डोंगरावर ते एकटेच विठ्ठलनाम घेत राहत. तुकारामांना देहू गावात सनातन वर्गाकडून प्रथम त्रास सोसावा लागला. त्यांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणी नदीमध्ये बुडवल्या आणि पुन्हा त्या वह्या तरंगून जशाच्या तशा वर आल्याची एक चमत्कारकथा सांगितली जाते.

तुकारामांचे अभंग

तुकारामांचे अभंग हे समाजातील दुष्ट प्रवृत्तीवर हल्लाबोल करणारे तसेच भक्तीने भारलेले होते. तुकारामांना जातीयवादाबद्दल खूप चीड होती आणि ही चीड ते आपल्या अभंगातून उतरवतात. ‘माऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास | कठीण वज्रासी भेदू ऐसेअसे तुकारामांनी आपल्या अभंगात वर्णन केले आहे. त्यांना समाजातील विषमता, उच्च निच्चपणाबद्दल चीड होती. समाजात काही लोक अज्ञान, गरीब लोकांची धर्माच्या नावे पिळवणूक करीत होती. हे तुकारामांना बघवत नव्हते.

तुकारामांनी आपल्या अभंगात समाजातील दिन-दुबळ्यांची सेवा करणाऱ्याला देव मानले आहे. ते आपल्या अभंगात म्हणतात

जे का रंजले गांजले | त्यांसी म्हणे जो आपुले

तोचि साधू ओळखावा | देव तेथेचि जाणावा

तुकारामांनी माणसाचे संपूर्ण जीवनच अभंगांमधून प्रकट केले आहे. भागवत संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला पण तुकारामांनी त्यावर कळस चढवला असे म्हणतात.

 $ads={1}

तुकारामांचे कार्य

तुकारामांनी मात्र माणसाच्या वयक्तिक चारित्र्याच्या शुद्धतेबरोबरच त्यांचे सामाजिक चरित्र्यही शुद्ध असावे असा आग्रह धरला. अनेक देवदेवता, त्यांची अर्थशून्य पूजा, भलभलत्या उपासनेच्या पध्दती, अंधश्रद्धा, देवाच्या नावाने चालणारे ढोंग आणि अन्याय, जातीव्यवस्थेमुळे वाढणारी विषमता अशा अनेक सामाजिक दोषांवरती फार त्वेषाने प्रहार केले. माणसांमधील सात्विक, सुजाणता, चांगुलपण जागे केले पाहिजे. पण त्याचंबरोबर त्याची दुष्टबुद्धि, अन्यायकारक वृत्ती, आंधळी भक्ती यांचाही नाश केला पाहिजे. अशा भावनेने तुकारामांनी अभंगरचना केली आहे. 

थोडे नवीन सर्वात जुने

संबंधित लेख